शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाकविरुद्ध मुस्लिम महिलांचा एल्गार : सांगलीत मोर्चा, विधेयक मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 18:57 IST

सांगली : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकाविरुद्ध सांगलीत सोमवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला.

सांगली : केंद्र सरकारच्या प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकाविरुद्ध सांगलीत सोमवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे मुस्लिम महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला. हे विधेयक मागे न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यातील मुस्लिम महिला आंदोलनात उतरतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन दिले. तिहेरी तलाकबाबतचे विधेयक (विवाह विधेयक अधिकारी संरक्षण) मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड व धर्मगुरूंचे मत न घेता, तयार करण्यात आले आहे. यास मुुस्लिम महिलांचा विरोध आहे. या विधेयकामुळे मुस्लिम कुटुंबांचे नुकसान होणार आहे. विधेयक मागे न घेतल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल. जिल्हास्तरावरुन सुरू झालेले हे आंदोलन देशव्यापी केले जाईल, असा इशारा महिलांनी दिला.

अ‍ॅड. सना कुरेशी, कौसरजबीन ढाले, अ‍ॅड. हमिदा खान, डॉ. शम्मीन पटेल, नसरीन कुरेशी, फातिमा मुल्ला, डॉ. शबनम शोख, अ‍ॅड. शफिना मुल्ला, डॉ. फरजाना मुल्ला, डॉ. तस्मया बानदार, रफिया खान, अलिमा शेख, असिफा सय्यद, तबसूम शेख यांच्यासह सांगली, मिरजेतील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. माजी महापौर मैनुद्दीन बागवान, असीफ बावा, उमर गवंडी, अय्याज नायकवडी, मुक्ती मुझम्मील, मुक्ती जबुरे, मुक्ती सादीक, मौलाना अब्दुल रौफ, मौलाना गुलास गौस बंदेनवाज, मौलाना जुबेर बेपारी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.पाण्याची सोयउन्हाचा तडाखा वाढल्याने मुस्लिम समाजातर्फे मोर्चात सहभागी झालेल्या महिला व मुस्लिम बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. वालचंद महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर पाच ते सहा ठिकाणी पाण्याच्या बॉटलचे वाटप सुरू होते. 

स्वयंसेवक तैनातमोर्चाच्या पार्श्वभूमीवर वालचंद महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय हा मार्ग पोलिसांनी बंद केला होता. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू राहिल्याने वाहतूक विस्कळीत बनली होती. मुस्लिम समाजाने त्यांचे स्वयंसेवक नियुक्त केले होते. हे स्वयंसेवक वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मदत करीत होते. तसेच वाहनांचे पार्किंग रस्त्याकडेला करण्यासही त्यांनी मदत केली. मोर्चा संपल्यानंतरही सहभागी महिला जाईपर्यंत स्वयंसेवक रस्त्यावर थांबून वाहतूक सुरळीत करीत होते.